Ashish Bhojane
आठवणी
काही गोष्टी साठवायच्या असतात
सवड मिळाल्यावर आठवायच्या असतात
मनाच्या गाभाऱ्यात जपायच्या असतात
पापणीखालील आसमंतात लपवायच्या असतात
आणि जेव्हा कधी आयुष्य
नेऊन ठेवतं दूर कुठेतरी आडमार्गावर
तेव्हा आयुष्य सोडून
याच आठवणी जागायच्या असतात
- आशिष भोजने